बंगळुरु – टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीच्या बिदाडी येथील कारखान्यात गेल्या अनेक दिवसापासून कामगारांनी संप पुकारला होता. हा संप आता समाप्त झाला असल्याची माहिती कंपनीने जारी केली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये व्यवस्थापन आणि कामगारात मतभेद निर्माण झाल्यानंतर कंपनीने टाळेबंदी जाहीर केली होती.
त्यावेळी कामगारांनी बैठा सत्याग्रहात केला होता. एका कामगाराला काम कामावरून काढून टाकण्यात आल्यानंतर व्यवस्थापन आणि कामगारात मतभेद निर्माण झाले होते. आता कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी औपचारिकरित्या संप मागे घेतला असल्याची माहिती दिली आहे. या अगोदरच 3,350 कामगार कामावर रुजू झाले आहेत. कर्नाटक सरकार आणि कामगार मंत्रालयाने या प्रकरणात मध्यस्थी करून परिस्थिती हाताळल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कामगारांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन एक मार्च रोजी कंपनीने स्वीकारले. त्यानंतर पाच मार्च रोजी सर्व कामगारांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. आता कामगारांनी काम सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. कंपनीच्या बिदाडी येथील परिसरात दोन कारखाने असून येथे वर्षाला 3.10 लाख वाहनांची निर्मिती होते.