मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झालं आहे. यातच महाविकास आघाडी सरकारवर भाजप पक्षाने चांगलाच हल्लाबोल केला आहे. योग्य नियोजन आणि समन्वय केलं असतं तर आज मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती आणि मराठा समाजावर ही परिस्थिती आली नसती , भाजपाने जे केलं ते यांना कधीही जमणार नाही ! असं म्हणत भाजप पक्षाने ठाकरे सरकारच्या कामावर टीका केली आहे.
यातच पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपकडून होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे
‘आम्ही ज्यांना मित्र समजत होतो, ते तर शत्रू निघाले मात्र, आम्ही कधीही कोणाशीही शत्रुत्व पत्करलं नाही. वैयक्तीक टीका करत ही मंडळी इतक्या खालच्या थराला जातील असा विचार मी कधीही केला नव्हता. आम्ही कधीही अशा प्रकारच्या टीका केली नाही. पण ठीक आहे. जनता सगळं पाहतेय.’