राजगुरूनगर– राजगुरूनगर आणि राजगुरूनगर परिसर आज अवकाळी पावसाने झोडपून काढला. राजगुरूनगर परिसरात झालेल्या जोराच्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
आज शुक्रवारी (दि.२०)रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोराचा अवकाळी पाऊस झाला.सुमारे पाऊण तास झालेल्या पावसात सर्वत्र पाणीच पाणी झाले.राजगुरूनगर सह जवळपासच्या गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. जोराच्या पावसामुळे अनेकांची धावपळ झाली.आजच्या पावसाने वीटभट्टीवरील कच्चा विटा भिजल्याने मोठे नुकसान झाले. राजगुरूनगर सह दावडी, वाफगाव, चास, कडूस परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
राजगुरूनगर शहरात जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले अनेकांच्या पार्किंगमध्ये पाणी साचले.शहरात गटार योजनेचे काम सुरू असल्याने अनेक गटारे बंद झाल्याने पावसाचे पाणी आणि गटारात पाणी रस्त्यावर आले. घाण युक्त व दुर्गंधी युक्त पाणी शहरातून वाहत असल्याने काही भागात मोठी दुर्गंधी पसरली. गेली दोन दिवसांपासून वातावरणात मोठी गर्मी पसरली होती आज अखेर त्याचे जोरदार पावसात रूपांतर झाले