रयत क्रांतिच्या आंदोलनाला यश
कराड – कडेगाव तालुक्यातील रायगाव येथील केनऍग्रो साखर कारखान्याने मागील वर्षीच्या गळीत हंगामातील आठ महिन्यापासून थकवलेल्या ऊस बिलांच्या रक्कमा जमा कराव्यात. यासाठी रयत क्रांतीचे सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर दोन दिवस ठिय्या मारला होता. बुधवारी कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांच्या रक्कमा खात्यावर जमा केल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले.
केनऍग्रोने प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना केवळ आश्वासने देवून फसवल्याने संतप्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थकित ऊसबिलासाठी रयत क्रांतिचे नलवडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर दोन दिवस ठिय्या मारला होता. टप्प्या-टप्प्याने या आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय नलवडे यांनी घेतला होता. तत्पूर्वीच कारखाना प्रशासनाने चर्चेची तयारी दाखवत बिले देण्याचे मान्य केले.
त्याप्रमाणे कारखाना प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची ऊस बिले जमा केली. व उर्वरित शेतकऱ्यांची ऊस बिलेही पुढील महिन्याच्या दहा तारखेपर्यंत टप्प्या-टप्प्याने देण्याचे मान्य केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले
रयतक्रांतीच्या या आक्रमक पवित्र्याने वाघेरी, सुर्ली, शामगाव, निगडी, घोलपवाडी, कानकात्रे, लिंब, लोणी, वसगडे, पाडळी, पारगाव, वंजारवाडी, वान्याचीवाडी येथील आंदोलनकर्त्यांमधून थकित ऊस बिल मिळाल्याने समाधान व्यक्त केले.