नवी दिल्ली – राज्यातील सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. राज्यातील फडणवीस सरकारला उद्या 5 वाजेपर्यंत सगळ्या आमदारांची शपथ देण्यात यावी, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. गुप्त मतदान देखील होणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे कि ‘उद्या नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल …’
दरम्यान, महाराष्ट्राचा सत्तापेच सर्वोच्च न्यायालयाच्या दारी गेला होता. या निर्णयाकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. उद्याच्या उद्या बहुमत चाचणी व्हावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, 27 नोव्हेंबरला उद्या विश्वासदर्शक ठराव मांडला जावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.