मुंबई – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी यंदा भारताचे 126 खेळाडूंचे पथक जपानला रवाना होणार आहे. ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होत असलेले हे सर्वात मोठे पथक आहे. त्यामुळे भारताला यंदा पदक मिळण्याच्या आशाही अधिक आहेत.
भारताचे सर्वच खेळाडू अव्वल दर्जाचे आहेत. मात्र, त्यातील 19 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी याच्याकडूनच पदकाची आशा सर्वात जास्त आहे. त्याच्या खेळाचे कौतुक थेट टाइम मसिकानेही केल्यामुळे तो एकदम प्रकाशझोतात आला आहे.
2018 सालच्या आशियाई स्पर्धेत तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा नेमबाज सौरभ चौधरी ऑलिम्पिकमध्येही वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज बनला आहे. टाइम मासिकाने जगातील 48 खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली.
ज्यांच्यावर यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा आहे. त्यात भारताच्या केवळ सौरभ चौधरी याच्याच नावाचा समावेश आहे. सौरभ सध्या क्रोएशिया येथे ऑलिम्पिकपूर्व सराव करत आहे. सौरभ 10 मीटर एअर पिस्तूल आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धेत सहभागी होणार आहे.