टोकियो – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मंगळवारी झालेल्या पुरुष गटाच्या हॉकी लढतीत भारतीय संघाने बलाढ्य स्पेनचा 3-0 असा धुव्वा उडवला व स्पर्धेत थाटात पुनरागमन केले. या विजयाने हॉकी संघाचे स्पर्धेतील आव्हान टिकण्यास मदत होणार असून संघाला पदकाच्या शर्यतीतील आव्हान कायम राखण्यात यश मिळाले आहे. आता उर्वरित दोन सामन्यांत त्यांना विजय मिळवावा लागणार असून त्यानंतरच त्यांचा पदकाचा दावा निश्चित होणार आहे.
A Clinical Win ✅
Clean Sheet ✅India register their second win of #Tokyo2020. What a game! 💪
🇮🇳 3:0 🇪🇸#HaiTayyar #IndiaKaGame #TeamIndia #Tokyo2020 #TokyoTogether #Cheer4India #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/U212PAPw5W
— Hockey India (@TheHockeyIndia) July 27, 2021
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारतीय संघाला बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 7-1 असा दारुण पराभव केला होता. त्यावेळी भारतीय संघावर टीका सुरू झाली होती व अत्यंत सुमार कामगिरी करत असलेल्या भारतीय गोलकीपर व बचावपटूंच्या क्षमतेवरच शंका घेतली जाऊ लागली होती. त्यातून बाहेर येत आश्वासक वाटचाल कायम ठेवण्यासाठी त्यांना स्पेनविरुद्धच्या लढतीत विजयाची गरज होती. हे ओळखूनच भारतीय हॉकीपटूंनी अफलातून खेळ केला.
पुरुष हॉकी संघाने अगटातील दुसऱ्या लढतीत भारताने स्पेनचा 3-0 असा पराभव करत विजयाची नोंद केली आहे. सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंगने केलेल्या गोलमुळे भारताने विजय मिळवला.
भारतीय संघाला आठव्या मिनिटाला पहिला गोल करण्याची मिळालेली संधी सिमरनजीतच्या चुकीमुळे वाया गेली. 14 व्या मिनिटाला सिमरनजीतने पहिला गोल करत भारताला या सामन्यात आघाडी मिळवून दिली. भारताला पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या. रुपिंदर यावेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेत दुसरा गोल केला आणि ही आघाडी 2-0 अशी वाढवली.
त्यानंतर 24 व्या मिनिटाला पीआर श्रीजेशला पाचारण करण्यात आले. पहिले सत्र पूर्ण झाले तेव्हा भारताची आघाडी कायम होती. दुसरे सत्र सुरू झाल्यावर स्पेनने आक्रमक खेळ करत गोल करण्याचे अनेकदा प्रयत्न केले मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. भारताच्या बचावपटूंनी कमालीची कामगिरी करत स्पेनचे सर्व प्रयत्न अपयशी ठरवले. सामन्यातील तिसरा गोल करत रुपींदरपाल सिंगने आपला दुसरा गोल नोंदवला.
बचाव व आक्रमणच निर्णायक ठरेल
गतवैभवासाठी सज्ज असलेल्या भारतीय संघाच्या क्षमतेवरच शंका घेतल्या जात होत्या. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे खेळाडू देखील दडपणाखाली होते. मात्र, स्पेनला नमवल्यावर खेळाडूंना पुन्हा एकदा आत्मविश्वास मिळाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पदकाचा दावा निश्चित करायचा असेल तर त्यांना आक्रमणाबरोबरच बचावही अभेद्द ठेवावा लागणार आहे.