नवी दिल्ली – आज राष्ट्रीय पत्रकार दिन आहे. त्यानिमीत्त दिलेल्या एका संदेशात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशात खोटारडे लोक सत्तेवर असल्याने आज सत्य बोलणारालाच शिक्षा दिली जात आहे. देशात 16 नोव्हेंबर रोजी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यानिमीत्त देशात हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय पत्रकारीता दिन म्हणून साजरा केला जातो.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर ही प्रतिक्रीया दिली आहे. त्यात त्यांनी नॅशनल प्रेस डे हा हॅश टॅगही वापरला आहे. राहुल गांधी यांनी शनिवारीच पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या संबंधात भाजप सरकारवर टीका केली होती. त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनावर भाष्य करणाऱ्या दोन पत्रकारांना तेथे पोलिसांनी अटक केली होती. त्यावरून सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी यांनी म्हटले होते की, हे लोक पत्रकारीतेचीच हत्या करण्यात व्यस्त आहेत.