नगर – परतीच्या पावसाने बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु आहेत. आज अखेर 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असून, उद्या (दि.8) पंचनाम्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बाधित पिकांच्या पंचनाम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होतील की पंचनामे करण्यास प्रशासन मुदतवाढ देईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला असून, शासनाकडून त्याला उभारी देण्यासाठी बाधित पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानुसार स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायका मार्फत गाव-गावात पिकांचे पंचनामे करण्यात येत आहे. यातीनही समित्यांनी पंचनामे केल्या नंतर त्याचा एकत्रीत अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. आज अखेर जिल्ह्यात 2 लाख 50 हजार हेक्टर बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
उद्या (दि.8) रोजी पंचनामे करण्याचा शेवटचा दिवस असून राहिलेले बाधित क्षेत्राचा पंचनामा होईल का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.त्यामुळे प्रशासनाकडून मुदतवाढ मिळावी अशी ही मागणी शेतकऱ्यामधून होत आहे.
शेतकऱ्यांसमोर अस्मानी सोबतच सुलतानी संकट पुढे आली नाही. त्यानंतर 3 ऑक्टोबरला फेरनिविदा मागवण्यात आल्या. तेव्हाही प्रतिसाद मिळाला नाही. त्याला 5 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
मात्र अद्याप कोणतीही कंपनी या क्लस्टरचा विमा घेण्यासाठी पुढे आलेली नाही विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या याच 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा फायदा झालेला आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी पावसाची अवकृपा यामुळे शेतकरी नेहमीच संकटात असतो. अशावेळी शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा आधार असतो. अशा परिस्थितीमध्ये जर पीक विमा उतरवण्यासाठी कोणतीही कंपनी समोर येत नसेल तर सरकारने आपल्या कंपन्यांमार्फत पीक विमा उतरवावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत.