नवी दिल्ली : भाजपा खासदार वरूण गांधी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केंद्रातील आपल्याच पक्षाच्या भाजपा सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी वरूण गांधी यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेविषयी उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये बोलताना परखड भूमिका मांडली आहे. यासोबतच, आपल्याच पक्षाच्या केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पीलिभीत या आपल्या मतदारसंघात वरूण गांधींनी सोमवारी अंगणवाडी सेविका आणि इतर महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना वरुण गांधी यांनी महात्मा गांधींच्या मारेकऱ्याचा जयघोष करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे, असं देखील म्हणाले. “महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी गोडसे जिंदाबाद बोलणाऱ्या लोकांना फाशी दिलं पाहिजे. आता जय हिंद म्हणण्याची वेळ आली आहे.
आज पीलीभीत में संविदा कर्मियों जिनमें मनरेगा, स्वास्थ्य,आंगनबाड़ी,आशा बहुएं,शिक्षामित्रों व अन्य की वेदना को जाना।
संविदा कर्मी भी दूसरे सरकारी कर्मचारियों की तरह समान मानदेय के साथ समान सम्मान के भी हकदार हैं।नियमितीकरण और सम्मान की इस लड़ाई में मैं इनके साथ अंत तक खड़ा रहूंगा। pic.twitter.com/AqCCsYEzgB
— Varun Gandhi (@varungandhi80) December 20, 2021
भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम होते. ज्यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं. गांधीजींच्या जयंतीच्या दिवशी सोशल मीडियावर गोडसे जिंदाबाद ट्रेंड होत होता. आपल्याला एक हिंदुस्थान करायचा आहे. सरकार कुणाचं आहे, याची मला फिकीर नाही. मी तुमच्यासोबत आहे” असं वरूण गांधी यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी “मी इथे काही मुख्यमंत्र्यांना किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी आलेलो नाही, मी देशाचं राजकारण करायला आलो आहे”, असे सांगत उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणांवर देखील निशाणा साधला.
वेतन, कामाबाबतच निश्चिती अशा काही मूलभूत मागण्यांसाठी या महिला कर्मचारी आंदोलन करत आहेत. “आज माझ्यासमोर आख्खा देश बसला आहे. माझ्यासमोर ना कुणी हिंदू आहे ना कुणी मुसलमान, ना कुणी पुढारलेला आहे, ना कुणी मागास. असा भेद करून आपण हिंदुस्थानला कमकुवत करत आहोत. मी इथे तुमचा मुद्दा फक्त देशाच्या संसदेत मांडण्यासाठी आलेलो नाही. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना निवेदन देण्यासाठी देखील आलेलो नाही. तेही मी करीन, पण इथे मी आलोय ते तुम्हाला सांगायला की मी या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहे”, असे वरूण गांधी यावेळी म्हणाले.