नवी दिल्ली – वाढत जाणाऱ्या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबर विद्यापीठ आणि पुढील 10-15 वर्षांत देशाचे नाव ऑलम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रीडा विद्यापीठ लवकरच उभारली जातील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी दिली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात 10व्या भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ओडिशाचे विधानसभा अध्यक्ष डॉ.सुजोय पात्रो, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, राहुल कराड आणि कुलगुरू डॉ. एन. टी. राव हे उपस्थित होते.
सावंत म्हणाले, भविष्यात आतंकवाद्याकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्या वाईट घटनांना परिणाम देण्यात येणार आहे त्याचा सामना तरुणांनी करावा यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सायबर विद्यापीठ सुरू करणार आहे. यासोबतच राज्यात उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत यासाठीही क्रीडा विद्यापीठ सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी देशेत दिले जाणारे संस्कार हे आयुष्यभर सोबत असतात. त्यामुळे प्रत्येक शाळा व कॉलेजमध्ये राष्ट्रगान गाण्याचा निर्णय घेतलेला आहे.
राज्यात 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी रोज राष्ट्रगाने गातात. युवकांना चांगल्या मार्गावर नेण्यासाठी राज्यातील सर्व महाविद्यालय अल्कोहोलरहित व रॅगिंगरहीत करण्यासाठी सरकारने पाऊले उचलेली आहेत. देशातील प्रत्येक मुलांमध्ये देशभक्ती जागृत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी उदय सावंत यांना “आदर्श युवा आमदार सन्मान’ने गौरविण्यात आले. मणिपूरचे आमदार के. लिसिया, दिल्लीचे सौरभ भारद्वाज यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.