कोलकाता :– पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील मारग्राम येथे झालेल्या बॉम्बस्फोटात तृणमूल कॉंग्रेसचा कार्यकर्त्या ठार झाला, तर आणखी एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आहे.
या स्फोटात मरण पावलेल्या कार्यकर्त्याचे नाव न्यूटन शेख असे आहे. त्याच्या कुटुंबीयांनी या हल्ल्याला कॉंग्रेस समर्थक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मात्र पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, मारग्राममध्ये कॉंग्रेस पक्षाची अत्यंत अल्प ताकद आहे. त्यामुळे हे कार्यकर्ते कोणावरही हल्ल्याच्या प्रकरणात सहभागी असण्याची शक्यता नाही.
Delhi : आता मुख्याध्यापकांच्या नियुक्तीला राज्यपालांचा अडथळा
बीरभूम जिल्ह्याची सीमा झारखंडला लागून असल्याने या हल्ल्यात माओवाद्यांचा सहभाग असू शकतो का, यावर पश्चिम बंगालचे शहरी विकासमंत्री फिरहाद हकीम म्हणाले की, हा हल्ला कसा आणि का झाला हे शोधण्यासाठी पोलिसांनी सर्व पैलूंचा तपास केला पाहिजे. ते म्हणाले की, हा एक मोठा कट आहे आणि त्यात बॉम्ब बनवण्याच्या सामग्रीचा स्रोत तपासला गेला पाहिजे.