TMC MP Kirti Azad: “पळपुटे, गद्दार, तुम्हाला जायचे असेल तर जा, पण…” ; कल्याण बॅनर्जी अन् कीर्ती आझाद यांचा बंडखोर खासदारांवर हल्लाबोल
TMC MP Kirti Azad: तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे खासदार कल्याण बॅनर्जी आणि कीर्ती आझाद यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षातील बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली.

TMC MP Kirti Azad: तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चे खासदार कल्याण बॅनर्जी आणि कीर्ती आझाद यांनी आज पत्रकार परिषद घेत पक्षातील बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. या खासदारांच्या हालचाली भाजपच्या इशाऱ्यावर सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांना “गद्दार” आणि “पळपुटे” असे म्हटले आहे.
कल्याण बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, “काही बंडखोर खासदारांना सत्तेशिवाय राहता येत नाही. “त्यांना सरकारी बंगला, गाडी आणि सुरक्षा हवी असते. त्यामुळेच ते पक्षविरोधी भूमिका घेत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. (TMC MP Kirti Azad)
तर दुसरीकडे कीर्ती आझाद यांनीही बंडखोर खासदारांवर निशाणा साधताना, “आमचे २९ खासदार ‘मा, माती आणि मानुष’ या तृणमूलच्या विचारसरणीच्या जोरावर निवडून आले. जर त्यांना पक्षाबाबत काही आक्षेप होते, तर ते निवडणुकीनंतर लगेच का मांडले नाहीत?” असा थेट सवाल केला.
ते पुढे म्हणाले, “सुखेंदू शेखर रॉय यांनी मतभेद असल्यामुळे राजीनामा दिला होता. जर इतर बंडखोर खासदारांमध्येही राजकीय नैतिकता असेल, तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी.” असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.

TMC MP Kirti Azad: “पळपुटे, गद्दार, तुम्हाला जायचे असेल तर जा, पण…” ; कल्याण बॅनर्जी अन् कीर्ती आझाद यांचा बंडखोर खासदारांवर हल्लाबोल
काकोली घोष यांनी उल्लेख केलेल्या पत्रावरही आझाद यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ज्या पत्राचा उल्लेख केला जात आहे, ते अद्याप सार्वजनिक झालेले नाही. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयानेही असे कोणतेही पत्र प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, या खासदारांनी भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने त्यांच्या भाजपशी जवळीक असल्याचा संशय अधिक बळावतो,” असे ते म्हणाले. (TMC MP Kirti Azad)
बंडखोर खासदार काकोली घोष यांच्यावर टीका करताना आझाद यांनी, “त्या पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिल्याचा दावा करत आहेत. मग त्या पक्षाच्या व्हीप कशा राहू शकतात? व्हीपची नियुक्ती पक्षाकडून केली जाते. त्यांच्या सध्याच्या हालचाली स्पष्टपणे पक्षविरोधी आहेत.”असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी की, “काही बंडखोर खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेतृत्वाच्या सूचनेनुसार काम करत असून टीएमसीविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत” असा गंभीर आरोप केला.





