कोलकाता – पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये TMC नेत्याच्या हत्येनंतर सोमवारी रात्री उशिरा हिंसाचार उसळला. येथे जमावाने 10-12 घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. या आगीत 10 जण जिवंत जळाले आहेत. एकाच घरातून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आतापर्यंत उसळलेल्या हिंसाचारात एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
घटना कल रात की है,10-12 घर थे जो जल चुके हैं, कुल 10 लोगों की मृत्यु हुई है जिनकी बॉडी रिकवर की गई है। एक ही घर से 7 लोगों के शव निकाले गए हैं: रामपुरहाट में तृणमूल नेता की हत्या के बाद कथित रूप से भीड़ द्वारा घरों में आग लगाने से कई लोगों की मृत्यु पर दमकल अधिकारी, बीरभूम pic.twitter.com/66ptPD3NXK
— ANI_HindiNews (@AHindinews) March 22, 2022
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे टीएमसी नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर टीएमसी कार्यकर्ते संतप्त झाले आणि परिसरात हिंसाचार पसरला. संतप्त जमावाने 10-12 घरांचे दरवाजे बंद करून पेटवून दिले. या आगीत 10 जण जिवंत जळाले. सध्या परिसरात तणावाचे वातावरण पाहता मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी उपाध्यक्षाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्याचवेळी पोलीस आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.