दौंड – नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी कर्जत आणि दौंड तालुक्यातील पूर्व भागातील दशक्रिया विधी होत असतात. हे दशक्रिया विधी या ठिकाणीच करण्यामागे कारणही तसेच आहे., आणि ते म्हणजे या भागात भीमा नदीचे पाणी वाहते असते.
अंतिम संस्कारानंतर होणाऱ्या या विधीसाठी पाणी हा घटक सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, भीमा नदी तीव्र दुष्काळामुळे कोरडी पडली असल्याने पाणी विकत घेऊन ते या नदीच्या दशक्रिया विधीच्या घाटावर मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना आणावे लागत आहे. पंधरा दिवसांपासून ही स्थिती आहे. अंतिम विधीसाठी नदीच्या घाटावरच पाणी विकत घेऊन आणून विधी पार पाडावे लागत आहेत. निदान विधीसाठी पाणी विकत घेण्याची वेळ येऊ नये, असे नागरिक भावना व्यक्त करताना दिसत आहेत.