श्रीनगर – भारतीय लष्कराने आज तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू काश्मिरमधील शोपियां येथे भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी दहशवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. यामध्ये भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे शुक्रवारी रात्री पुंछमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यात गुलपूर सेक्टर आणि खरी करमाडा भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. पती-पत्नी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्करानेही पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.