नवी दिल्ली : दिल्लीत झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्यांपैकी किमान ८२ जण गोळीबारात जखमी झाले आहेत, तर एका व्यक्तीचा मृत्यू त्याला पेतवल्याने झाला आहे. अन्य एका मृताच्या शरीरावर अॅसिद हलल्याच्या जखमा आहेत. भोस्कल्याचा आणि लाठी काठीने मारहाण केल्याचे प्रकार स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे गुडांनी स्थानिक बेरोजगार तरुणांना शस्त्र पुरवून दंगल घडवल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.
पोलिसांनी २५० पीडितांची यादी तयार केली आहे. यात मृत आणि जखमींचा समावेश आहे. म्हणजेच तीनपैकी एका व्यक्तीला गोळी लागली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदुका आल्या कोठून हा सवाल निर्माण होत आहे.
दंगलीतील मृतांची संख्या ३८वर पोहोचली आहे. त्यातील२९ मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना रिकामी ३५० काडतुसे मिळाली आहेत. काही छर्रे सापडले आहेत असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्थानिक भुरट्या गुन्हेगारांनी गावठी पिस्तूल आणि गोळ्यांचा साठा करून ठेवला होता. असा निष्कर्ष काढला आहे. हा साठा त्यांनी स्थानिक बेरोजगार आणि मजुरांना देऊन दंगलीत सहभागी करून घेतले असावे असा संशय आहे
पोलिसांनी घातलेल्या छाप्यात तलवारी स्फोटक रसायनाचा साठा ताब्यात घेतल्याचे समजते.
दरोडे; चेन स्नाचीग सारख्या गुन्ह्यात यापूर्वी पकडलेल्या गुन्हेगारांनी ही शस्त्रे वाटल्याचे पुरेसे पुरावे आहेत. पोलिसांनी त्यांची घटे आणि अड्ड्यांवर छापे टाकण्यास सुरवात केली आहे.त्यातील अनेक जण फरार झाले आहेत.असे पोलिस सांगत आहेत