चंद्रपूर – लॉकडाउन शिथील झाल्यानंतर राज्यात पुन्हा अपघातांची मालिका सुरू झाल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली जवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना अपघातग्रस्त इर्टिगा गाडीचा टायर फुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नागपूरवरून चंद्रपूरकडे इर्टिगा गाडीतून काही जण प्रवास करत होते. मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने चंद्रपूर-नागपूर मार्गावर मांगली येथे वाहनाचा टायर अचानक फुटला. यानंतर वाहन तब्बल 100 फूट घासत पुढे गेले. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर या अपघाताबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी अपघातची नोंद करून घेतली.