लडाख : भारत- चीन सीमेवर झालेल्या चकमकीत तीन भारतीय जवान शहिद झाले आहेत. रात्री उशिरा लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन सैन्यात चकमक झाली असून १९६७ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये हिंसक चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये १ अधिकारी तर २ भारतीय जवान शहिद झाले आहेत. त्याचबरोबर घटनास्थळी दोन्ही सैन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. १९९३ सीमेवरील शांतता कराराचा यावेळी भंग झाला आहे.
या घटनेमुळे भारताच्या तिन्ही सेनादलाच्या प्रमुख्यांच्या उपस्थितीत बैठक झाली असून यावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे देखील यावेळी उपस्थित होते. या चकमकीत दोन्ही देशांचे अनेक जवान जखमी झाल्याचे देखील म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.