डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी या गावांमधील अनेक शेतकऱ्याच्या हजारो बॉयरल कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. कोरोनाची महामारी असताना या मेलेल्या हजारो कोंबड्याची खड्डे खोदून विल्हेवाट लावणे गरजेचे असताना, मात्र त्या उघड्यावर टाकल्या असून या कोंबड्या चार दिवसापूर्वी मेल्या असल्याने त्या कोंबड्याना भयंकर दुर्गंधी सुटलेली आहे.
यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. मेलेल्या कोंबड्या उघड्यावर टाकलेल्यावर आणि कोरोनाच्या महामारीत नागरिकांचे आरोग्य घोक्यात आणणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
माझ्या शेडमध्ये 5000 पक्षी आहेत आणि गेल्या आठवडाभरापासून उष्णता भयंकर असल्याने अठराशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तसेच बारामती तालुक्यात टाळेबंदी असल्याने सर्वच वाहतूक बंद आहे. यामुळे विक्रीदेखील होत नाही यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांने सांगितलेय.
– गणेश जाधव ( शेतकरी )