पुणे – कॉंग्रेस पक्षाला विचारांची, त्यागाची, बलिदानाची आणि योगदानाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने कॉंग्रेसने देशाचा प्रवास घडविला आहे. कॉंग्रेसचे हे योगदान आणि ही राष्ट्रहिताची दृष्टी आजच्या तरूण कार्यकर्त्यांमध्ये पेरली पाहिजे, रूजवली पाहिजे असे मत माजी खासदार अशोक(अण्णा) मोहोळ यांनी व्यक्त केले.
शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आणि अर्बन बॅंकेचे संचालक सूर्यकांत उर्फ बाळासाहेब मारणे यांच्या एक्काहत्तरी निमित्त कॉंग्रेसचा विचार जगलेले आणि आयुष्यभर कॉंग्रेस पक्ष्याशी निष्ठा राखलेल्या पाच ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांचा सत्कार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
मधुकरजी सणस, भगवानजी धुमाळ, रामचंद्रजी उर्फ भाऊ शेडगे, शेखरजी बर्वे आणि बुवा नलावडे या पाच ज्येष्ठ कॉंग्रेसजनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहनजोशी व रमेश बागवे यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला.
राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, उल्हासदादा पवार आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप उपस्थित होते तर समितीच्या वतीने भोला वांजळे, महेश अंबिके, धनंजय भिलारे, संजय अभंग, नितीन पायगुडे, अशोक काळे, शंकर शिर्के, सुरेश ऊकीरंडे गणेश कुरे, बाळूशेठ ओझा, समीर धाडगे, स फैयाज शेख, संजय मोरे, गणेश मारणे, राजू नाणेकर,कुणाल काळे, विजय शिर्के, राजेंद्र खराडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.