बीग बी अर्थात अमिताभ बच्चनला आजवर इतका राग आलेला कोणीही पाहिली नसेल. ऑफ स्क्रीनवर अजिबातच नाही. ऐश्वर्याच्या विवाहाविषयी किंवा गरोदरपणाच्या मुद्द्यांविषयी अनेक चुकीचे वृत्त प्रसिद्ध झाले, एमएनएस विरोधात असताना देखील त्यांनी संताप व्यक्त केला नव्हता.
पण आता ते इतके संतापले की त्यांनी थेट ब्लॉगमध्ये असे लिहिले की, माझ्या मरणाची वाट बघणाऱ्या जर मी माझ्या 90 मिलियन फोलोअर्सला लिहिले की, ठोक दो साले को, तर विचार कर तुझे काय होईल. महानायक आज त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांप्रमाणे आज स्वत: लढू शकत नाही. पण ते एक मोठी लढाई नानावटी रुग्णालयातील बेडवरून लढत आहेत. जगभरातील कोट्यवधी लोकांचा जीव घेणाऱ्या करोनाशी ते संघर्ष करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांना संसर्ग झाल्याने हा लढा अधिक गंभीर आहे.
अशा परिस्थितीत सोमवारी बिग बीच्या डोळ्यांतून अश्रू आले, जेव्हा त्यांची सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांना अचानक हा संदेश मिळाला की “मला आशा आहे की आपण या कोविड-19 बरोबर मराल’. हा संदेश एसएमएस की सोशल मीडियावरून आला हे बिग बी यांनी स्पष्ट केले नाही. परंतु ते आपला राग रोखू शकले नाही आणि आपला राग ब्लॉगवरून व्यक्त केला.