वाघोली – करोनामुळे यंदा पायी वारी निघणार नाही. त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराजांची पालखी वारी हेलिकॉप्टरने पंढरपुरला नेण्यात यावी, अशी मागणी भाविक दत्तात्रय गोते पाटील, बाळासाहेब भोसले यांनी केली आहे.
ज्ञानेश्वर महाराज संस्थानकडे याबाबत पत्र दिले असून हेलिकॉप्टरची व्यवस्था आणि सर्व खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एसटी बसमधून पंढरपूर जवळील वाखरी गावात जाणार आहे. तेथून पंढरपूरपर्यंत पायी होणार आहे.
एसटी बसमधून नेण्याऐवजी पालखी हेलिकॉप्टरने नेण्यास परवानगी देण्यात यावी. यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही यावेळी गोते पाटील यांनी सांगितले.