मुंबई – विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर आज राज्यात ‘राष्ट्रपती राजवट’ लागू झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर खलील प्रमाणे राज्याचा कारभार चालणार आहे.
राष्ट्रपती राजवटीत असा चालणार राज्याचा कारभार
– राष्ट्रपती राजवटीत राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांकडे
– बऱ्याचदा राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यपाल राज्याचे सरकार चालवतात
– राज्यपाल मुख्य सचिवांच्या साहाय्याने कारभार बघतात
– या काळात राज्यपालांना धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत
– मुख्यमंत्र्यांना असणारे अधिकारी राज्यपालांना वापरता येत नाहीत
– राज्याचा अर्थसंकल्प संसद मंजूर करु शकते
– राज्याच्या विधीमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे
– कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश देण्याचे अधिकार राष्ट्रपतींना
– राष्ट्रपती राजवटीत उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित