मुंबई – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शना खाली गेली 35 वर्ष दुर्गामाता दौडीच आयोजन केले जाते. यंदाही गेली नऊ दिवस सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडीची सांगता झाली. यावेळी संभाजी भिडे यांनी आमदार, खासदार आणि लोक प्रतिनिधी हे लोकशाहीला कलंक असल्याची जहरी टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’आपल्या मातृभूमी साठी जगणारी माणसं पाहिजेत पण तेथेच बोंब आहे. आपले आमदार खासदार यांना लोक निवडून देतात पण यांना शरम वाटत नाही. हे आमदार खासदार लोकशाहीला आणि परंपरेला भाडोत्री, बेकार, कलंक आहेत. अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आहे.