मुंबई – भाजप-राष्ट्रवादीची सत्ता अस्तित्वात आल्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या पार्श्वभूमीवर साईवच स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे खासदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंद करत शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीकाही केली आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, आम्ही म्हटलंच होतं की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे समजायला अजून बरेच जन्म घ्यावे लागतील! “चाणाक्य”ना समजण्याची “हीच ती वेळ!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन! अखेर सामान्य जनतेला न्याय मिळाला!!, असे ट्विट त्यांनी केले आहे.
आम्ही म्हटलंच होतं की, मा.नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह हे समजायला अजून बरेच जन्म घ्यावे लागतील! “चाणाक्य”ना समजण्याची “हीच ती वेळ!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अभिनंदन! अखेर सामान्य जनतेला न्याय मिळाला!!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 23, 2019