बॅंकॉकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य
बॅंकॉक : बॅंकॉक येथे आयोजित आदित्य बिर्ला समूहाच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी जगभरातील देशांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी आवाहन केले. यावेळी त्यांनी गुंतवणुकीसाठी भारत जगात सर्वांधिक आकर्षक अर्थव्यवस्थेपैकी एक असल्याचे सांगत गुंतवणुकीसाठी सध्याची वेळ चांगली असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
PM in Bangkok: This is the best time to be in India. Many things are rising while others are falling. Ease of doing business, ease of living, FDI, forest cover, patents, productivity, infrastructure are rising. While taxes, tax rates, red tapism, corruption,cronyism are falling. pic.twitter.com/YAFYgDRxSj
— ANI (@ANI) November 3, 2019
बॅंकॉकमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारतातील गुंतवणूकीविषयी देशाला आवाहन केले. भारत आता 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे स्वप्न पाहत आहे. जेव्हा 2014 मध्ये माझ्या सरकारने कार्यभार स्वीकारला. त्यावेळी भारताचा जीडीपी ट्रिलियन अमेरिकन डॉलर होता. 5 वर्षांत आम्ही ती सुमारे 3 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवली. आजच्या भारतात परिश्रमी करदात्यांच्या योगदानाचे कौतुक केले जाते. करक्षेत्रात आम्ही महत्वाचे काम केलेले आहे.
भारतात गुंतवणुकीसाठी हीच सर्वांत चांगली वेळ आहे, असे आवाहन मोदी यांनी गुंतवणूकदारांना केले आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचे विभाजन करण्याचा उल्लेख करत भारताने दहशतवाद आणि फुटीरतावादामागील मोठे कारण नष्ट केल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदींनी थायलंडच्या राजधानीत आयोजित भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात काश्मीरचा उल्लेख केल्यानंतर तिथे उपस्थित सुमारे 5 हजार लोकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.