पुणे – परदेशांतून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी संबंधित देशातील विमानतळावरच होते. संबंधित व्यक्तीस करोनाची लक्षणे दिसल्यास अशा तिला भारतात जाण्यास परवानगी दिली जात नाही. त्यानंतर ही प्रवाशाची माहिती केंद्र शासनाकडे पाठवली जाते.
केंद्रशासन ती विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून संबंधित राज्याच्या आरोग्य विभागांना पाठवते. हे प्रवासी विमानतळावर आल्यानंतर त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी होते. त्यानंतर आरोग्य विभागाने 4 विशेष बस तयार केल्या असून, त्यातून या प्रवाशांना सणस मैदानातील तात्पुरत्या विलगीकरण कक्षात आणले जाते. तिथे त्यांचा पत्ता, नाव, मोबाइल क्रमांक तसेच त्यांनी कुठे प्रवास केला याची माहिती घेऊन पुन्हा एकदा तपासणी केली जाते. तसेच घरी कशा प्रकारे विलगीकरण करावे सार्वजनिक संपर्क टाळावा, अशा सूचना देऊन पाठले जाते.