मुंबई : देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याचा विषय राष्ट्रवादी काँग्रेस कडून उचलला गेला होता. त्याबाबत आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. अजित पवारांना भाषणासाठी उठा म्हंटलं पण तेच उठले नाहीत अजित दादांनीच नकार दिला’ असे म्हणत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
महाराष्ट्राच्या अपमानाचा विषयच नाही
या प्रकरणाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देहू येथील व्यासपीठावर आम्ही सगळेच होते. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मी.. आदी मान्यवर होते. आम्ही सर्वांनीच पाहिलं की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवार यांना भाषणासाठी उठा म्हटलं. पण अजित दादांनीच नकार दिला. टीव्ही कॅमेऱ्यांनी हा क्षण अनेकदा दाखवलाही. त्यामुळे अजित पवारांनी भाषण केलं नाही, यात महाराष्ट्राच अपमान झाला, असं काही नाही, असं उत्तर चंद्रकांत पाटलांनी दिलं.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली जाते, मात्र महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले होते. त्यानंतर या घटनेविरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून आंदोलनही करण्यात आले होते. मात्र यावर आता चंद्रकांत दादा पाटील यांनी अजितदादांना बोलण्याची संधी दिली होती मात्र ते स्वतःचा बोलले नाहीत. असे म्हंटले आहे.