सध्या फुल्ल फॉर्मात चाललेली “ये है मुहोब्बते’ ही सिरीयल बंद होणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. करण पटेल आणि दिव्यांका त्रिपाठीच्या या सिरीयलबाबतची ही चर्चा गेल्या 2 वर्षांपासून सुरू होती. त्यामुळे या सिरीयलच्या प्रेक्षकांना थोडी हुरहूर लागून राहिली होती, पण आता त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. हा शो बंद करण्याचा आपला काहीही प्लॅन नाही, असे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. स्वतः दिग्दर्शक संदीप सिकंद यांनीच हे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या स्लॉटमध्ये या सिरीयलला सर्वाधिक टीआरपी मिळतो आहे. त्यामुळे या सिरीयलबाबत लोकांना जे काही बोलायचे असेल, ते बोलू द्या. पण ही सिरीयल आम्ही बंद करणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे.