नवी दिल्ली – राजस्थान विधानसभेमध्ये आज सत्ताधारी काँग्रेसतर्फे सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारा एक ठराव मंजूर करण्यात आला. राजस्थान सरकारच्या या निर्णयाविरोधात आता भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनी याबाबत बोलताना, ‘राजस्थान विधानसभेमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात संमत करण्यात आलेल्या ठराव म्हणजे लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे’. अशी प्रतिक्रिया दिलीये.
प्रसिद्ध वृत्तसंस्था ‘एएनआय’ने याबाबत माहिती दिली आहे. ‘संविधानामध्ये राज्यांना केंद्राने पास केलेल्या कायद्यांविरोधात ‘अशा’ प्रकारचे ठराव मंजूर करण्याची स्वायत्तता देण्यात आली नाही. हा ठराव मंजूर करण्यामागे देशाची फाळणी करण्याचा कट आहे.’ असा आरोप शेखावत यांनी केला.
देशामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मोठा वाद पेटला असून या कायद्याविरोधात व समर्थनार्थ देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलनं सुरु आहेत.
Union Minister Gajendra S Shekhawat on Rajasthan Assembly passes anti-CAA resolution:It amounts to murdering the democracy.Assemblies are going beyond limited autonomy granted by Constitution by passing these resolutions.This is a conspiracy to divide the country&isn’t acceptable pic.twitter.com/6wBkU86BJB
— ANI (@ANI) January 25, 2020