मुंबई – जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. ही चौकशी एसआयटीमार्फत होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना राज्य सरकारने दिलेला आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
“जलयुक्त शिवार’ गैरव्यवहाराची एसआयटीमार्फत होणार खुली चौकशी
जलयुक्त शिवार योजना पूरे राज्य के किसानों के लिए एक जन आंदोलन था। यह योजना लोगों की भागीदारी के साथ गांवों तक पहुंची। इस योजना में किसानों, मजदूरों द्वारा किया गया श्रम अपार है। क्या आप इन श्रमिकों के श्रम की जांच करेंगे? pic.twitter.com/43CyfEUA53
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 14, 2020
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटरवर व्हिडियो शेअर करत ठाकरे सरकावर हल्लाबोल केला आहे.
शेलार म्हणाले, ”जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. हा चौकशीचा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकरी, कामगार, शेतकरी यांनी केलेल्या कामावर चौकशी लावण्या सारखा आहे. ही चौकशी म्हणजे महाराष्ट्र सरकारचे फडणवीस सरकारच्या या योजनेवर अन्याय आहे, हा आमचा आरोप आहे.” असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारलेले या व्हिडियोत दिसत आहेत.