केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया येत आहेत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर केला असून तो फसवा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
अजित पवार म्हणाले, लोकसभेसह देशातील आगामी नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खूश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे “वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे.