मुंबई: युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक वरळीतून निवडणूक लढवणार असल्याचंगी माहिती सामोरे येत आहे. त्यामुळे आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी याच मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सचिन खरात यांनी जयंत पाटील यांना पत्र लिहून निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या विरोधीपक्षांना घेऊन आघाडी करत असेल तर त्या आघाडीचा उमेदवार आदित्य ठाकरे विरुद्ध लढणार असे समजावे, असा पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.