मुंबई – रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतले असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. या कारवाईचा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी निषेध केला आहे.
मुंबईत माध्यमांच्या स्वातंत्र्यावर झालेला हल्ला निंदनीय आहे. आणीबाणीप्रमाणेच ही महाराष्ट्र सरकारची कृती आहे. आम्ही त्याचा निषेध करतो, असे ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.
मुंबई में प्रेस-पत्रकारिता पर जो हमला हुआ है वह निंदनीय है। यह इमरजेंसी की तरह ही महाराष्ट्र सरकार की कार्यवाही है। हम इसकी भर्त्सना करते हैं।@PIB_India @DDNewslive @republic
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) November 4, 2020
काय आहे प्रकरण?
रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेतले. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी अन्वय नाईक यांनी सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचे नाव होते.
दरम्यान, पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा रिपब्लिकने केला आहे.