नवी दिल्ली :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग पाचव्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरदिली. मात्र काँग्रेसचे नाव येताच निर्मला सीतारामन चांगल्याच भडकल्या. एवढंच नाही तर त्यांनी, “मी सोनिया गांधी यांना हात जोडून विनंती करते की त्यांनी आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जास्त जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे” असे यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
I want to tell the Opposition party that on the issue to migrants we all must work together. We are working with all states on this issue. With folded hands, I ask Sonia Gandhi ji that we must speak & deal with our migrants more responsibly: FM Sitharaman pic.twitter.com/CHXLxWiqPO
— ANI (@ANI) May 17, 2020
निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, “मला विरोधी पक्षांना आवाहन करायचे आहे की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केले पाहिजे. आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत. सोनिया गांधी यांना हात जोडून मी विनंती करते की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलले आणि वागले पाहिजे.
करोनामुळे देशावर आरोग्य आणि आर्थिक संकट ओढवले आहे. मागील दीड महिन्यापासून देशातील सर्व व्यवहार जवळपास ठप्प असल्याची स्थिती आहे. त्यामुळे आर्थिक प्रश्नांनी डोकं वर काढले आहे. राज्यांचे उत्पन्नाचे मार्ग बंद असून, राज्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, करोनाच्या संकटाशी तोंड देत असलेल्या सर्वच राज्यांना केंद्राकडून सर्वोतोपरी मदत केली जात असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.