कोल्हापूर: भाजपात यावे म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे तेच रात्री-अपरात्री भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात. मी टोपी फेकलेली आहे ती कुणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपात जाणार नाही, असा खुलासा केला असावा असा टोला भाजपाचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात लगावला.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आज कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे कागल चे आमदार हसन मुश्रीफ त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला श्री मुश्रीफ हे सर्हदयी माणूस आहे ते अनुभवी आहेत त्यांच्यासारखे के लॉक भाजपात आले तर चांगलीच गोष्ट आहे असेही ते म्हणाले
जे जे राष्ट्रवादीचे चे दहा बारा आमदार भाजपात येणार आहेत त्यात कोल्हापूरचा कुणाचाही समावेश नाही असा खुलासाही श्री पाटील यांनी यावेळी केला. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रकांतदादा कोल्हापूरमध्ये आल्यानंतर दसरा चौकात जोरदार स्वागत करण्यात आले.