मुंबई – राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते बंडखोर नाहीत तर गद्दार आहेत. जनतेचे प्रेम आमच्यासोबत आहेत. या आमदारांना एक दिवस आमच्यासमोर येऊन बसावे लागेल आणि आमच्या डोळ्यात घालून बोलावे लागेल असे आदित्य यांनी म्हटले आहे.
तसेच या बंडखोरांनी आमच्यासमोर यावे आणि सरकार आणि पक्षात काय चुकीचे आहे, ते आम्हाला सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले. ज्यांनी विश्वासघात केला ते कधीच जिंकू शकणार नाहीत. जनतेचे प्रेम आमच्यासोबत असल्याचा आम्हाला विश्वास असल्याचेही ते यावेळी म्हणाले. राज्यातील आणखी एक मंत्री उदय सामंत बंडखोर गटाला जाऊन मिळाले असल्याच्या संदर्भात आदित्य म्हणाले की हा त्यांचा निर्णय आहे.
एकदिवस त्यांनाही आमच्या समोर यावे लागेल. आमच्या नजरेला नजर भिडवावी लागेल. जे येथून पळून गेले ते स्वत:ला बंडखोर म्हणवताहेत. मात्र त्यांना बंड करायचे असते तर त्यांनी इथे राहुन केले असते. त्यांनी अगोदर राजीनामा द्यायला हवा होता आणि निवडणूक लढवाला हवी होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाबाबत काही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. न्यायालयाने सभागृहातील संभाव्य शक्तीप्रदर्शनालाही नकार दिला आहे. आदित्य म्हणाले आमदारांचे दुसरे शक्तीप्रदर्शन त्या आमदारांचे माझ्यासमोर होईल. सरकारने आणि आम्ही काय चुकीचे केले हे त्यांना सांगावे लागेल.