नवी दिल्ली – केंद्रामध्ये मोदी सरकार स्थापन झाल्यापासून आज निती आयोगाची पहिली बैठक नवी दिल्ली येथे सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षत्येखाली आयोजित करण्यात आलेल्या नीति आयोगाच्या बैठकीला अनेक राज्यातील मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांनी उपस्थित लावली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या निती आयोगाच्या बैठकीमध्ये जल संधारण, कृषी आणि सुरक्षेतेच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. ही बैठक राष्ट्रपती भवनात सुरु असून या बैठकीला वित्त, गृह, संरक्षण, कृषी, वाणिज्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मंत्र्यांनी देखील उपस्थित लावली आहे.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अनुपस्थिती दर्शविली आहे.
तत्पूर्वी, या बैठकीला उपस्थित राहणे आपल्याला जमणार नसल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. तसे त्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून कळवले होते.
#WATCH Prime Minister Narendra Modi chairs the 5th meeting of the Governing Council of NITI Aayog in Delhi. Telangana CM K Chandrashekar Rao, West Bengal CM Mamata Banerjee & Punjab CM Captain Amarinder Singh are not present at the meeting. pic.twitter.com/CjOfaHVcpP
— ANI (@ANI) June 15, 2019