मुंबई – अभिनेत्री रविना टंडन हे नाव जरी समोर आलं तरी आठवत ‘टीप टीप बरसा पाणी’ हे गाणं. हे गाणं आजही सुपरहिट आहे. या गाण्यानं बॉलीवूडला एक नवा ट्रेंड देखील दिला. या गाण्याच्या रिलीज नंतर भर पावसात अभिनेत्रीला घेऊन गाण्याचे चित्रण करण्याचे प्रमाण चांगलाच वाढलं होत. मात्र रविनासाठी भर पावसात हे गाणं शूट करणं तितकं सोपं नव्हता.अभिनेत्रीने या गाण्याच्या शूटिंगसाठी अनेक अटी देखील घातल्या होत्या.
अभिनेता अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचं टीप टीप बरसा पाणी हे गाणं आजही देशाच्या कानाकोपऱ्यात ऐकलं जात. रवीनाने या गाण्यात केला बोल्ड डान्स आजही अनेक अभिनेत्रींच्या डान्सपुढं फिका वाटतो. विशेष म्हणजे याच गाण्यामुळे अक्षय रविनाची केमीस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडू लागली होती. नुकतंच रवीनाने आपण या गाण्यासाठी निर्मात्यापुढे अनेक अटी ठेवल्या असल्याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
रवीनाने यावेळी सांगितले,”मी गाण्यात साडी सोडणार नाही, अश्लील हावभाव करणार नाही, इंटिमेट सीन देणार नाही, कीसदेखील करणार नाही या सर्व गोष्टी माझ्या डोक्यात क्लेअर होत्या त्यामुळे या सर्व बाबी आधीच निर्मात्यांसमोर स्पष्ट केल्या होत्या असं रविना सांगते. या गाण्यातून केवळ कामुकताच दर्शवण्यात आली आहे आणि ती हावभावातून दर्शवता येते त्यालाच अभिनय म्हणतात त्यामुळे तुम्ही काय परिधान केलं आहे याचा तिथे फरक पडत नाही असं देखील रवीनाने यावेळी म्हंटले
या गाण्याच्या शुटिंगवेळी रवीनला १०२ डिग्री ताप देखील होता. शूटिंग अशा ठिकाणी होत कि तिथं पाऊस येणं अशक्य होत यामुळे कृत्रिम पाऊस पाडला जाणार होता. पाणी तितकं स्वच्छ असेलच याची खात्रीही नव्हती. अशा सगळ्या परिस्थितीत हे गाणं शूट झालं आणि प्रेक्षकांनी या गाण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं.