जवसला मराठीत आळशी, तर हिंदीमध्ये आलसी असे म्हणतात. जवस खाल्याने फायबर मिळते. फायबर्समुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवले जाते.
2.रक्तदाब आटोक्यात ठेवते. हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, किडनी निकामी होणे, यासारख्या गंभीर समस्या होतात. जवस नियमित खाण्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. आहारात जवसचा वापर उपयोगी ठरतो.
3.जावसमधील अँटिऑक्सिडंट शरीराला डिटॉक्स करतात. ज्यामुळे लिव्हर प्रॉब्लेम दूर करण्यास मदत होते.
4.रोज 1 चमचा जवस पावडर खाल्याने हाडे व सांधे मजबूत होतात.
5.जवस खाण्यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. फायबर्सही मुबलक असते. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. जवस खाल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते. त्यामुळे मधूमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.
6.केस राहतात निरोगी आणि सुंदर. कोरड्या केसांसाठी गुणकारी औषध आहे. कोंडा, खाज, आणि केसगळती सारख्या समस्यांपासून दूर राहू शकतो. जवस कसे खावे – जवस बिया थोडया भाजून त्यामध्ये काळे मीठ किंवा साधे मीठ, तिखट, लसूण घालून मिक्सरला बारीक करून याची सुक्की चटणी करून आहारात समावेश करावा. जवसमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि भरपूर फायबर असतात. जवस भिजवून खाणे.
संध्याकाळी 1 लिटर उकळलेल्या पाण्यात 3 चमचे जवस टाकून रात्रभर झाकून ठेवा. सकाळी पाणी काढून घ्या आणि त्यातील जवस खाऊन घ्या. जवसाच्या पाण्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल असतात ज्याने डोळे, केस, आणि स्किन निरोगी बनवते. जवसाच्या बिया भाजी, सूप, सॅलड, दह्यात मिसळून खाणंही योग्य ठरते.
डॉ आदिती पानसंबळ, आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886.