पुणे – मागील काही दिवसांपासून रेल्वेचे खासगीकरण होणार, अशा प्रकारच्या चर्चा सुरू असून त्या चुकीच्या आहेत. रेल्वे ही देशाची संपत्ती असून सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे, रेल्वेचे खासगीकरण होणार नाही,’ अशी स्पष्टोक्ती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली.
पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गोयल बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट उपस्थित होते. गोयल म्हणाले, भाजपच्या काळात प्रवाशांना केंद्रबिंदू ठेवून रेल्वे सेवा अद्ययावत केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेत सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, राज्यातील भाजप सरकारने शेती, लघुउद्योग, पर्यावरण आदी क्षेत्रात उत्तम प्रकारे काम केल्याने राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.