डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि रोखीचा प्रवाह कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एटीएम कॅश ट्रान्झॅक्शनच्या नियमात मोठे बदल करण्याची योजना आखत आहे. 8 वर्षानंतर रिझर्व्ह बँक एक मोठा बदल करेल, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फरक पडेल.
प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेच्या समितीने अशी शिफारस केली आहे की एटीएममधून 5000 पेक्षा अधिक पैसे काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जावे. माहिती अधिकाराखाली विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हा खुलासा झाला. काय आहे हा खुलासा ते पाहूया.
5000 रुपयांहून अधिक रक्कम काढल्यास शुल्क आकारले जाईल
मीडिया रिपोर्टनुसार एटीएममधून 5 हजाराहून अधिक व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना 24 रुपये जादा द्यावे लागतील. त्याचबरोबर महिन्यातून 5 वेळा एटीएममधून व्यवहार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि त्यानंतर मात्र तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये द्यावे लागतील. रिझर्व्ह बँकेच्या समितीने याची शिफारस केली आहे. गेल्या आठ वर्षांत इतका मोठा बदल झाला नाही.
आरबीआय समितीकडून शिफारस
आरबीआयच्या समितीने बदल करण्याची शिफारस केली आहे. तथापि, अद्याप हा अहवाल सर्वांसाठी सार्वजनिक केलेला नाही. आरटीआयने मागविलेल्या माहितीच्या उत्तरात ही माहिती मिळाली. माहितीनुसार आरबीआयच्या एटीएम शुल्काचा आढावा घेण्यासाठी गठित समितीने यासंदर्भातील शिफारसी सादर केल्या आहेत.
ज्या अंतर्गत बँका 8 वर्षानंतर एटीएम शुल्क बदलू शकतात. आरटीआयला दिलेल्या प्रतिसादात मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँक कमिटीने रोख रक्कम काढणे कमी करण्याचे सुचविले होते. हा अहवाल 22 ऑक्टोबर 2019 रोजी सादर करण्यात आला होता. तथापि, हे सार्वजनिक केले गेले नाही.