रिपाइंचे नेते रामदास आठवले यांचे संकेत
नवी दिल्ली : राज्यात रोज नवीन काही ना काही तरी घडत असते.त्यातच विधानसभा निवडणुका पार पडल्यापासून ते आजर्यंत राज्यात राजकिय धक्के सर्वांना बसत आहेत. त्यात आता रिपाइंचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेत धक्कादायक संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यांत राजकीय भूकंप होणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. आधी देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी भूकंप केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तर आता आणखी एक नवीन भूकंप येणार असल्याचे म्हटले आहे.
Union Minister Ramdas Athawale: Maharashtra me ye 2 mahina bhukamp wala hi hai. Ek baar Devendra Fadnavis ji aur Ajit Pawar ka bhukamp ho gya, uske baad Uddhav Thackeray ji ka hua aur abhi kaisa bhukamp hota hai hum dekhenge,lekin koi na koi bhukamp hone ki sambhavna hai. pic.twitter.com/pP8sO2zn5a
— ANI (@ANI) December 15, 2019
एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात दोन महिन्यांत भूकंप होणार आहे. एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा झाला. आता कसा भूकंप होतो, ते आम्ही पाहू. पण कोणता ना कोणता भूकंप होण्याची शक्यता आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर शिवसेनेने लोकसभेत समर्थन करण्यावरुन आणि सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन कॉंग्रेस-शिवसेना समोरासमोर आले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस आणि शिवसेनेत संघर्षाचे वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. तत्पूर्वी शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही भाजप-शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात, असे म्हटले होते.