मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी जुलै 2020मध्ये 10 डीसीपी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यानंतर अनेक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पदभार स्वीकारला. परंतु, अचानक आदेश रद्द करण्यात आले. याबाबत ईडीने मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संबंधित बदल्यांबाबत तक्रारी आल्या होत्या, असे त्यांनी म्हटले. त्यांनी मला पोलीस आयुक्तांना यथास्थिती ठेवण्यास सांगितले. त्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि व्हॉट्सऍपद्वारे याबाबत माहिती दिली.
दरम्यान, 10 डीसीपींच्या सुधारित बदलीचे आदेश जारी करण्यासाठी स्वीकारलेले निकष माहित नाहीत. कारण, ते पोलीस आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर जारी केले होते. कदाचित पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना कळवले असेल आणि त्यांच्याकडून पुढील सूचना मिळाल्या असतील. पण त्या सूचना काय होत्या? मला माहीत नाही, असे कुंटे यांनी ईडीला सांगितले.
दरम्यान, पोलीस बदल्यांबाबत आतापर्यंत 28 बैठक पार पडल्या आहेत. तसेच या बैठकीत 27 बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. मात्र, या यादीतील एका बैठकतील आदेश काही कारणास्तव जारी करण्यात आला नाही. या सर्व बैठकीत अनिल देशमुख उपस्थित होते, अशी माहितीही कुंटे यांनी दिली.