नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, देशातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी देशव्यापी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्थलांतरीत मजुरांचे लोंढे घराची वाट चालू लागली झाली होती.
LIVE: Congress Party Briefing by Shri @ManishTewari, Spokesperson, AICC via video conferencing https://t.co/RXpYmon1Zc
— Congress Live (@INCIndiaLive) April 14, 2020
स्थलांतर रोखता येऊ शकेल का हा प्रश्न संपूर्ण देशातील प्रशासनापुढे होता मात्र, आज दिलेल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या भाषणावर टीका करताना यामध्ये स्थलांतरित कामगारांचा साधा उल्लेखही नव्हता असं म्हटलं आहे.
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी म्हटलं आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना आपल्याला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत हे सांगत आहेत. पण सरकार काय करत आहे याबद्दल नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला तो लोकांनी मान्य केला. हा लॉकडाउन आता वाढवला तोदेखील लोकांनी मान्य केला. पण लोकांसाठी सरकार काय करत आहे याच्याबद्दल काहीच सांगितलं जात नाही”. असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.