रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर – महाआघाडी सरकारने नियमित पिक कर्ज भरणा-या शेतक-यासाठी ५० हजारांची सवलत मिळणार असल्याने नियमित पिककर्ज भरण्यासाठी तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखामध्ये मोठी गर्दी केली आहे.
खेड तालुक्यात १८९ गावांमिळुन १०४ विकास सहकारी सोसायंट्या मार्फत जवळपास २६ हजार १४३ बँक खातेदार सोसायटी सभासद शेतक-यांना १४९ कोटी ३० लाख ९० हजार रुपये गेल्या खरीप हंगामातील पिक कर्ज रुपाने पीडीसीसी बँकेने वाटप केले होते. त्यातच महाआघाडी सरकारने थकीत कर्जमाफी केल्यामुळे अनेक शेतक-यांना याचा फायदा मिळाला.
नियमाप्रमाणे सोसायट्यामार्फत घेण्यात आलेले पिककर्ज जर मार्च अखेर भरले तर शेतक-यांनी शुन्य टक्के व्याज बसते त्यामुळे घेतलेले कर्ज रक्कम भरणा करावा लागत असतो. त्यामुळे खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाच्या शाखांमध्ये शेतकरी वर्ग पिक कर्जाचा भरणा करण्यासाठी बँकेत गर्दी करु लागल्याने प्रशासनाची आणि बँक कर्मचारी वर्गाची डोकेदुखी वाढली आहे. सध्या करोनाच्या संसर्ग जन्य आजारावर मात करण्यासाठी बँकेत ग्राहकांला गर्दी करु न देता बँकेबाहेर उन्हात रांगा लावुन ताटकळत उभे राहावे लागत आहे. संचारबंदीचे उल्लघंन होत असतानाही बँक कर्मचारी पुरता करोनाच्या भितीने हैराण झाला आहे.
राज्यात लॉकडाऊन असताना शेतकऱ्यांना मात्र बँकेत कर्ज भरण्यासाठी जावे लागत आहे अनेक शेतकऱ्यांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात येत आहे अखेर बँकेने पत्र दिल्यावर पासबुक पाहून त्यांना ओढण्यात येत आहे मात्र पीक कर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात यावी, शून्य टक्के व्याजदर व 50 हजार नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
दरम्यान वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेतकऱयांनी 31 मार्च पूर्वी पीककर्ज भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या.करोना आणि रणरणत्या उन्हातही शून्य टक्के व्याजदर व नियमित कर्ज भरणा 50 हजार शासनाचे अनुदान मिळण्यासाठी गर्दी झाली होती