पुण्यातील दोन वकिलांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे मागणी
पुणे – तामिळनाडू येथे पोलिसांच्या मारहाणीत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पुण्यातील दोन वकिलांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली. ऍड. आशिष पाटणकर आणि ऍड. प्रतिक राजोपाध्ये यांनी ही मागणी केली. पी. जयराज (59) आणि जे. बेनिक्स अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मोबाइलचे दुकान सुरू होते म्हणून दोघांना साथाकुलन पोलिसांनी ताब्यात घेतले. कोठडीत केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झालाचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर पिता-पुत्राला गुन्ह्यानुसार सात वर्षांपर्यंत शिक्षा झाली असती. कोणत्याही गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा असेल तर पोलिसांनी संबंधित गुन्ह्याचा तपास काळजीपूर्वक करायला हवा, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.
मात्र, पोलिसांनी कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करत दोघांनाही मारहाण केली व त्यात त्यांचा जीव गेल्याचे पत्रात म्हटले आहे.