नवी दिल्ली : देशात एकीकडे करोना बाधितांचा आकडा वाढत आहे तर दुसरीकडे देशातील एका राज्यात करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सिक्किम या राज्यात करोनाचा अजून प्रवेश देखील झालेला नाही. त्यामुळे इथल्या सरकारने ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे करोनाला अद्यापही सिक्किममध्ये शिरकाव करता आलेला नाही.
सिक्किम हे भारतातील एकमेव राज्य असे आहे जिथे अद्याप एकही करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. सात लाख लोकसंख्या असलेल्या हिमालयातल्या छोट्या राज्यात करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पर्यटकांसाठी ऑक्टोबरपर्यंत सीमा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सिक्किम प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सिक्किमशिवाय नागालँडमध्येही सध्या एकही करोनाबाधित नाही. नागालँडमध्ये एकाला करोनाची लागण झाली होती. पण एकमेव रुग्ण असल्याने त्यालाही आसाममध्ये नेण्यात आले. त्यामुळे आता नागालँडमध्येही करोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आहे.