सातारा -पोवईनाका परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस 450 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली आहे.
परिणामी सातारा शहराचा काही भाग आणि शाहूपुरी, करंजे, शाहूनगर, गोडोली, विसावा नाका परिसर, सदरबझार आदी परिसरात शनिवारी (दि. 4) पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने देण्यात आली.
प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस जलवाहिनीला गळती लागल्यानंतर तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नव्हते.
जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी उपसा बंद करण्यात आल्याने शनिवारी शाहूपुरी, करंजे, शाहूनगर, गोडोली, विसावा नाका परिसर, सदरबझार आदी ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक कार्यकारी अभियंता सौ. पल्लवी मोटे यांनी केले आहे.